Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

December 25, 2010

अर्थशास्त्र:economics for MPSC exam

जागतिक बँक-
जागतिक बँकेची (इंग्रजी: World Bank) स्थापना इ.स. २७ डिसेंबर १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्रजी: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थीक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. अविकसित देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले. गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आह.

जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकार्‍यांना प्रशिक्षण
अर्थव्यवस्थांचा विकास
भ्रष्टाचार निर्मुलन
गरीबी हटाव
संशोधन व शिक्षण
..
भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे. इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.
.
आर्थिक विकासदर:
आर्थिक विकासदर म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमधील सेवांच्या आणि उत्पादित मालाच्या मूल्याच्या वाढीचा दर होय. आर्थिक विकासदर साधारणपणे त्या अर्थव्यवस्थेच्या वार्षिक सकल उत्पन्नामधील वाढीच्या टक्केवारीच्या दरात मोजतात. हा दर चलनवाढीच्या दराला अनुरूप करून घेतात. अर्थात, सेवा व मालाच्या मूल्यामधून चलनवाढीचा परिणाम बाजूला काढून हा दर मोजतात. आर्थिक विकासदर हा सर्वसाधारणपणे एखाद्या देशामधील सरासरी राहणीमानामधील होणार्या सुधारणेचा दर्शक आहे .
चलनवाढ: महागाई मोजणाचं प्रमाण म्हणजे चलनवाढ. 
गुंतवणूकीचे प्रकार:(Types of Investments)
इक्विटी मार्केट
डेट मार्केट
बुलिअन मार्केट
रिअल इस्टेट
आर्ट(गुंतवणूक)
इन्शॉरन्स(गुंतवणूक)
प्रायव्हेट इक्विटी


म्युच्युअल फंड:
म्युच्युअल फंड(English:Mutual Fund) हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे ज्याचा वापर करून भारतीय गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतो संपत्ती निर्माण करणेसाठी समभाग निगडीत योजना, ज्यात शेअर बाजाराची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे निगडीत योजना ज्यात व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते. 
.
मुदत ठेव:
मुदत ठेव (अन्य नावे: फिक्स्ड डिपॉझिट; इंग्लिश: Fixed Deposit Receipts, Time deposit ; ) ही एखाद्या बँकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. मुदत ठेवीत सहसा अधिक मुदतीवर अधिक परतावा मिळतो..
समभाग:
समभाग (English:Shares/Stocks) कंपनीच्या एकूण भांडवलाच्या एककांना समभाग (Share) किंवा रोखे असे म्हणतात. समभाग हा कंपनीच्या मालकीचाच एक भाग असतो.समभागाच्या मालकाला भागधारक(ShareHolder) म्हणतात.

पुनर्गुंतवणूक(Reinvestment) न करण्यात आलेला नफा(Profit) हा लाभांश(Dividend) म्हणून गुंतवणूकदारांना(Investor) दिला जातो.
 

विक्री कर:
विक्री कर हा विकल्या जाणार्‍या वस्तूवर विकण्याच्या वेळी (Point of sale) लावला जाणारा कर आहे .

वार्षिक सकल उत्पन्न:
वार्षिक सकल उत्पन्न/राष्ट्रीय सकल उत्पन्न ही राष्ट्रीय आर्थिक स्थितीचे गणन करणारी महत्वाची आर्थिक मोजपट्टी आहे. वार्षिक सकल उत्पन्न दिलेल्या प्रादेशिक क्षेत्रात दिलेल्या कालावधीत झालेल्या उत्पादनांचे आणि सेवांचे मूल्य होय.

वार्षिक सकल उत्पन्न = उपभोगीता + गुंतवणूक + शासकीय खर्च + (निर्यात - आयात)
 


 







 

December 24, 2010

जागतिक वारसा स्थान(युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या यादीतील स्थान.)


आग्रा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश
फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेश
ताज महाल, आग्रा, उत्तर प्रदेश
गोव्यातील चर्च व इतर इमारती
सांची स्तूप, मध्य प्रदेश
खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश
भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश
चांपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
एलेफंटा केव्हस/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
अजिंठा-वेरूळची लेणी, महाराष्ट्र
चोल राजांची मंदिरे, तामिळनाडू
महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु
हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
कोणार्क सूर्य मंदीर, कोणार्क, ओरिसा
महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल
कुतुब मिनार, दिल्ली
लाल किल्ला, दिल्ली
हुमायूनची कबर, दिल्ली
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल


December 23, 2010

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०

अग्रक्रम:
प्रस्तुत सांस्कृतिक धोरणात अंतर्भूत करण्यात आलेल्या सर्वच बाबी आपापल्या परीने महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांच्या संदर्भातील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल. तथापि या समग्र धोरणाची अंमलबजावणी योग्य त्या कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक क्षेत्रातील काही मूलभूत बाबींच्या पूर्ततेकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा काही बाबींची नोंद या धोरणाच्या प्रारंभी अग्रक्रम म्हणून करण्यात आली असून शासन त्यांची अंमलबजावणी तत्परतेने करील.


१. सांस्कृतीक क्षेत्रासाठीआवश्यक तरतूद (चार टक्के रक्कम राखीव हे शब्द अंतीम आवृत्तीतून वगळले) - सांस्कृतिक क्षेत्रातील योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पाच्या चार टक्के रक्कम राखून ठेवण्यात येईल. राज्य शासनाच्या आधीपासून कार्यान्वित असलेल्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी आणि या धोरणात नमूद करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ही रक्कम उपयोगात आणली जाईल.

२. राज्य सांस्कृतिक निधी - अर्थसंकल्पातील तरतुदीच्या जोडीने राज्य शासनाचा स्वतंत्र असा एक 'राज्य सांस्कृतिक निधी' स्थापन करण्यात येईल. हा निधी उभारण्यासाठी शासकीय अर्थसाहाय्याच्या जोडीने लोकसहभागाचेही स्वागत करण्यात येईल. लोकसहभागामुळे लोकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि त्यांना सांस्कृतिक क्षेत्राला योगदान देण्याची संधी लाभेल. असा निधी उभारण्यासाठी आणि विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील विविध घटकांचे सहकार्य घेण्यात येईल. एरव्ही केवळ शासकीय तरतुदींमधून सहजरीत्या राबविता न येणार्‍या योजना/ उपक्रम या निधीतून राबविले जातील.

. सांस्कृतिक संस्था- स्वावलंबनातून विकास - शासकीय अनुदान घेणा-या संस्‍थांनी आपले कार्य आणि विश्‍वसनीयता यांच्‍या जोरावर उत्‍पन्‍नाचे शासकीय अनुदानाखेरीज अन्‍य स्रोत निर्माण करावेत आणि शक्‍य तितके स्‍वावलंबी होऊन आपल्‍या संस्‍थांचा विकास करावा, अशी सूचना संबंधित संस्‍थांना करण्‍यात येईल.

४. भाषाभवन - भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम एकत्रित राबविण्यासाठी मुंबईत 'रंगभवन' येथे 'भाषाभवन' उभारण्यात येईल. राज्य शासनाची भाषा व साहित्य यांच्याशी संबंधित सर्व कार्यालये या 'भाषाभवना'त असतील. शिक्षण, प्रशिक्षण, जतन, संशोधन आदी कार्यांसाठी या भवनात वेगवेगळी दालने व आवश्यक त्या सोयी-सुविधा असतील.

५. भाषा सल्लागार मंडळ - भाषा संचालनालयासाठीचे भाषा सल्लागार मंडळ त्वरित स्थापन करण्यात येईल. मराठी भाषेशी संबंधित अशा अस्तित्वात असलेल्या व प्रस्तावित सर्व शासकीय/निमशासकीय संस्था (राज्य मराठी विकास संस्था, मराठी बोली अकादमी, मराठी प्रमाण भाषा कोश मंडळ, मराठी शब्द व्युत्पत्ती कोश मंडळ, इ. संस्था) यांनाही हे मंडळ सल्‍ला देईल.

६. महाराष्ट्र विद्या – प्राच्यविद्या (ओरिएंटॉलॉजी) आणि भारतविद्या (इंडॉलॉजी) यांच्या धर्तीवर ‘महाराष्‍ट्रविद्या’ (महाराष्ट्र स्टडीज) अशी एक ज्ञानशाखा विकसित होत आहे. त्‍यासाठी ‘महाराष्‍ट्र प्रगत अध्‍ययन केंद्र’ या नावाची एक स्वायत्त संस्था स्‍थापन करण्‍यात येईल. या केंद्रात महाराष्‍ट्रविषयक सर्वांगीण अध्ययनाबरोबरच इतर राज्‍यांशी असलेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या संबंधांचे संशोधन, अध्‍ययन इ. करण्‍याचीही व्‍यवस्‍था असेल. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

७. दक्षिण आशिया संशोधन संस्था - गेल्या ५० वर्षांत केंद्र शासनाच्या साहाय्याने अन्य काही राज्यांत प्रगत संशोधन संस्था निर्माण झाल्या असल्या, तरी महाराष्ट्रात अशा संस्था निर्माण झालेल्या नाहीत, हे वास्तव ध्यानात घेऊन दक्षिण आशिया मधील (‘सार्क’ राष्ट्रांचा) विविधांगी अभ्यास करणारी एखादी संस्था महाराष्ट्रात निर्माण करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येईल आणि अशी संस्था स्थापन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

८. प्रमाण भाषा कोश - मराठीसाठी प्रमाण भाषा कोश नाही. अशा प्रकारचा प्रमाण भाषा कोश तयार करण्यासाठी 'प्रमाण भाषा कोश मंडळ' स्थापन करण्यात येईल. मराठी प्रमाण भाषेच्या समृद्धीसाठी मराठी प्रमाण भाषेमध्ये प्राकृत, संस्कृत इत्यादी भाषांसह मराठी भाषेच्या विविध बोलींतील निवडक शब्दांचाही आवर्जून समावेश करण्यात येईल. याशिवाय भारतातील अन्य भाषांतून आणि विदेशी भाषांतून स्वीकारण्यात आलेले आणि आता मराठीत रुळलेले शब्दही विचारात घेतले जातील.

९. मराठी बोली अकादमी - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. या बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोशनिर्मिती, साहित्यनिर्मिती तसेच या बोलींतून होणार्‍या कलांच्या सादरीकरणाचे संवर्धन इत्यादींसाठी एक स्वतंत्र ‘मराठी बोली अकादमी’ स्थापन करण्यात येईल. काही बोली या परप्रांतीय वा परकीय भाषांच्या प्रभावातूनही तयार झालेल्या आहेत. अशा बोलींविषयींचे प्रकल्पही या अकादमीमार्फत राबविण्यात येतील. पहिल्या वर्षी अकादमीसाठी रू. दहा कोटी राखून ठेवण्यात येतील. या रकमेच्या व्याजातून अकादमी काम करील. त्याशिवाय आवश्यकतेनुसार आवर्ती खर्चासाठी शासन दरवर्षी काही रक्कम अनुदान देईल.

१०. लेखनपद्धती/वाक्प्रयोग-पुनर्विचार - गेल्या ५० वर्षांत भाषिक आणि एकूण सामाजिक परिस्थितीत घडलेले बदल, तसेच माहिती तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली संपर्कसाधने इत्यादी बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेसाठी वापरल्या जाणार्‍या देवनागरी लिपीच्या लेखनपद्धतीमध्ये काही बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. हा बदल करताना पूर्वापार मराठी लेखनपद्धतीमधील काळानुरूप स्वीकारार्ह भाग कायम ठेवून मराठी भाषा व्यवहारोपयोगी आणि अधिक समृद्ध करण्याकरिता लेखनपद्धतीचे नियम अधिक तर्कसंगत आणि अधिक लवचिक करण्यात येतील. लेखनपद्धतीच्या संदर्भात जुन्या विचारांचे योग्य भान ठेवून नवीन प्रवाहांचे स्वागत करणारे अभ्यासक/ तज्ज्ञ यांच्या अभ्यासगटामार्फत लेखनपद्धतीचे नवे नियम ठरविण्यात येतील, तसेच, मराठीतील विशिष्ट शब्द, वाक्प्रयोग इत्यादींचा वापर करण्याच्या बाबतीतही पुनर्विचार केला जाईल. या अभ्यासगटापुढे विचारार्थ ठेवण्यात यावयाची काही उदाहरणे परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये देण्यात आली आहेत.

११. केंद्रीय आस्‍थापनांमध्‍ये मराठी अधिकारी – केंद्र शासनाच्‍या महाराष्‍ट्रातील संस्‍था, बँका, तसेच विविध मंडळे/महामंडळे इ. आस्‍थापनांवर हिंदी अधिका-यांप्रमाणेच मराठी अधिकारी नियुक्‍त करण्‍यात यावेत या पदांसाठी तसेच केंद्र शासनाच्‍या आकाशवाणी / दूरदर्शन या प्रसारमाध्‍यमांमधील कार्यक्रमविषयक व वृत्तविषयक पदांसाठी मराठी विषयात पदवी प्राप्‍त केलेले अधिकारी नियुक्‍त केले जावेत, यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरण्‍यात येईल आणि त्‍यासाठी आवश्‍यक ते प्रयत्‍न करण्‍यात येतील.

१२. कलासंकुल - प्रयोगात्म व दृश्यात्मक कलांच्या संवर्धनासाठी विभागीय पातळीवर प्रत्येक महसुली विभागात 'कलासंकुल' उभारण्यात येईल. या संकुलांमध्ये नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला, लोककला, आदिवासी लोककला, हस्तकला इत्यादींसाठी प्रशिक्षण, तालीम आणि सादरीकरण इ. साठी सोयी असतील. या सोयी भाडेतत्त्वावर कलाकार आणि सांस्कृतिक संस्था यांना उपलब्ध असतील. अशी संकुले उभारण्यासाठी शासन प्रत्येक विभागीय महसूल आयुक्तालयाला निधी उपलब्ध करून देईल.

१३. खुले नाट्यगृह - प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह (ऍम्फी थिएटर) आणि जिल्हा पातळीवर एक छोटेखानी, सुमारे ३५० ते ५०० आसनक्षमतेचे नाट्यगृह खाजगी सहभागाने बांधण्यात येईल. ते मुख्यत्वे सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरले जाईल.

१४. शास्‍त्रीय संगीतासाठी प्रोत्‍साहन योजना - मराठी रंगभूमी आणि लोककला यांच्‍यासाठी राज्‍य शासनाने अलिकडेच दोन स्वतंत्र प्रोत्‍साहन योजना (पॅकेज) जाहीर केल्या आहेत. त्‍याच धर्तीवर शास्‍त्रीय संगीतासाठी अनेक उपक्रमांचा समावेश असलेली शास्त्रीय संगीत प्रोत्‍साहन योजना अमलात आणली जाईल. शिष्‍यवृत्‍ती, सन्‍मानवृत्‍ती, जीवन गौरव पुरस्‍कार, संगीतसभांना (‘म्‍युझिक सर्कल्‍स’ना) अनुदान, महाविद्यालयीन पातळीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्‍यासाठी अर्थसाहाय्य इ. उपक्रमांचा या योजनेत समावेश असेल.

१५. ललित कला अकादमी – केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात दृश्यात्मक कलेसाठी कार्य करणार्‍या संस्थेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र ललित कला अकादमी स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्‍यात येईल. अकादमीच्या अंतर्गत सुयोग्य ठिकाणी कलाग्राम स्‍थापन करण्‍यात येईल. त्‍यामध्‍ये पुढील सुविधा असतील- धातू ओतशाळा (मेटल फाउंड्री), ग्राफिक्‍स स्‍टुडिओ, सिरॅमिक फाउंड्री, प्रदर्शनासाठी कलादालन, कार्यशाळा (वर्कशॉप शेड), भाडेतत्त्वावर आवश्यक तितके स्‍टुडिओ, खुले नाट्यगृह (ऍम्‍फी थिएटर), अतिथिगृह इत्यादी.
शिव किल्ले मालिका योजना
महात्मा फूले आणि शाहू महाराजांचे मुंबईत स्मारक



१६. संतपीठ - पैठण येथे स्‍थापन झालेल्‍या संतपीठाचे कार्य तांत्रिक अडचणी दूर झाल्‍यानंतर त्‍वरित सुरु करण्‍यात येईल. हे संतपीठ सर्व धर्मांतील व जातींतील मानवतावादाचा पुरस्‍कार करणा-या संतांच्‍या विचारांचे व कार्याचे अध्‍ययन आणि अभ्‍यास करणारे केंद्र म्‍हणून विकसित करण्‍यात येईल. शिक्षक व अन्‍य शासकीय कर्मचारी, तसेच सर्वसामान्‍य जिज्ञासू यांच्‍यासाठी लघुमुदतीच्‍या अभ्‍यासक्रमांचे केंद्र, संतांच्‍या विचारांवर संशोधन करणा-या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्‍यांसाठी संदर्भालय आणि विविध धर्मांतील व जातींतील संतांच्‍या विचारांचा/कार्याचा तुलनात्‍मक अभ्‍यास करण्‍यासाठी महत्त्वाचे केंद्र म्‍हणून सदर संतपीठ विकसित करण्‍यात येईल.

१७. परदेशात अध्यासने - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठात (अमेरिकेत) आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठात (ब्रिटनमध्ये) अध्यासन निर्माण करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल. ही अध्यासने शासनाच्या आर्थिक सहभागाबरोबरच त्‍या दोन्‍ही देशांतील तसेच आपल्‍या देशातील लोकांच्‍या सहकार्यातून निर्माण करण्‍याचे प्रयत्न करण्यात येतील.

१८. सहजीवन शिक्षण - स्त्री-पुरुषांनी परस्परांना नीट समजावून घ्यावे, त्यांनी एकमेकांचा आदर करावा आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी पोषक ठरावे, असे सहजीवनाविषयीचे प्रबोधनात्मक शिक्षण शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना देण्यात येईल. यासाठी मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञ व परिपक्व व्यक्तींकडून/शिक्षकांकडून असे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल.


साहित्य सम्राट अणाभाऊ साठे यांचे स्मारक
लहानमुलांसाठी सांस्कृतीक केंद्रे

१९. लोकप्रतिनिधींसाठी प्रशासन प्रशिक्षण – ग्रामपंचायती, पंचायत समित्‍या, जिल्‍हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच विधिमंडळामध्‍ये निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींना शासकीय योजना, संसदीय प्रणाली, प्रशासकीय व्यवस्था अशा राज्यव्यवहाराच्या सर्वांगीण माहितीबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगताची माहिती व्हावी, यासाठी ‘यशदा’सारख्या प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील.

२०. प्रसारमाध्यम अवलोकन समिती - वृत्तपत्रे, तसेच इलेक्ट्रॉनिक व अन्य प्रसारमाध्यमे यांचे आविष्कारस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या माध्यमांची अभिरुचिसंपन्नता व विश्वसनीयता टिकून राहावी आणि वृद्धिंगत व्हावी, त्यांनी व्यवस्थेतील अनिष्ट बाबी समाजाच्या निदर्शनाला आणण्याबरोबरच समाजात घडणार्‍या विधायक घडामोडींचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा असते. या दृष्टीने, त्यांच्याद्वारे प्रकाशित होणारा मजकूर/जाहिराती यांचे नियमित अवलोकन होणे अत्यावश्यक बनले आहे. याकरिता एका समितीचे गठन करण्याची गरज आहे. प्रत्येक प्रकारच्या माध्यमाच्या प्रतिनिधींनी आपणहून स्वयंशासनाच्या उद्देशाने अशी समिती स्थापन करावी, हे इष्‍ट ठरेल. काही कारणाने असे घडण्यात अडचणी येत असतील, तर शासन अशा प्रकारची समिती स्थापन करील. या समितीत माध्यमांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, न्यायपालिकेचे प्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, वाचक व प्रेक्षक यांचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्‍याबाबत दक्षता घेण्‍यात येईल. एखाद्या प्रसारमाध्यमातून जाणता-अजाणता सामाजिक सौहार्द बिघडेल अथवा शांतताभंग होईल अशा प्रकारचा अथवा इतर काही दृष्टींनी समाजविघातक मजकूर/दृश्ये प्रकाशित/प्रसारित झाल्यास समिती स्वत:हून अथवा कोणी ती बाब समितीच्या निदर्शनास आणल्यास त्याची दखल घेईल आणि भविष्यात या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित प्रकाशनाचे मालक/ संपादक यांच्या नजरेस आणून देईल. या समितीच्या कार्याचे स्वरूप सल्लागार समितीसारखे असेल. याशिवाय, पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी आणि उद्बोधनासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, प्रकाशने असे उपक्रम समितीतर्फे आयोजित करण्यात येतील. पत्रकारांच्या संस्था/संघटना असे उपक्रम आयोजित करीत असतील, तर शासन त्याकरिता आर्थिक मदत देईल. तसेच, राज्य व राष्ट्र यांच्या हिताच्या विविध बाबी पत्रकारांच्या नजरेस आणून देण्याचे कार्य या समितीतर्फे वेळोवेळी करण्यात येईल. तसेच, विविध प्रसारमाध्यमांतून दिल्या जाणार्‍या बातम्या आणि सादर केले जाणारे वेगवेगळे उपक्रम यांची वस्तुनिष्ठता, ग्राह्याग्राह्यता, गुणवत्ता, विधायकता, अभिरुची इत्यादी बाबींचे योग्य आकलन व मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित व्हावी, म्हणून माध्यमांचे वाचक, श्रोते व प्रेक्षक यांच्यासाठी या समितीमार्फत उपक्रम राबविले जातील. असे उपक्रम राबविणार्‍या अन्य व्यक्तींना/संस्थांना प्रोत्साहन/साहाय्य दिले जाईल.

२१. कार्यालये व विभाग हस्तांतरण - शासकीय कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले भाषा संचालनालय, मराठी भाषेच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य मराठी विकास संस्था, उर्दू भाषेसाठी कार्य करणारी उर्दू अकादमी, तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी/बृहन्महाराष्ट्र मंडळ वा तत्सम संस्था यांना साहाय्य करणे हे विषय सध्या सामान्य प्रशासन विभागाचे आहेत. ग्रंथालय संचालनालय उच्च शिक्षण विभागाकडे आहे. तसेच, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र साधनांसाठीच्या समित्याही याच विभागाकडे आहेत. लोकसाहित्य समिती शालेय शिक्षण विभागांतर्गत येते. या सर्व विषयांचा सांस्कृतिक कार्य विभागाशी जास्त जवळचा संबंध आहे. याकरिता हे सर्व विषय यापुढे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे असतील. तसेच, दृश्यात्मक कलांच्‍या शिक्षणाविषयीचा भाग उच्च शिक्षण विभागाकडे ठेवून त्या कलांविषयींच्या अन्य बाबी कला संचालनालयाकडे असतील आणि कला संचालनालय हे पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल. दृश्यात्मक कलाविषयक संवर्धन, प्रशिक्षण, जतन, संस्थांना अनुदान, वयोवृद्ध कलाकार मानधन, पारितोषिके, प्रदर्शने, जीवन गौरव व अन्य पुरस्कार इत्यादी अन्य योजनांसाठी कला संचालनालय कार्य करील. उपरोक्त सर्व विषय व कार्यालये आर्थिक तरतूद व मंत्रालयीन प्रशासकीय यंत्रणेसह पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे वर्ग करण्यात येतील.

२२. सांस्कृतिक समन्वय समिती - साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासाठी कार्य करणार्‍या राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध समित्या, मंडळे, महामंडळे, संचालनालये यांच्या कार्यात एकवाक्यता आणि समन्वय असावा, यासाठी या संस्था आणि कार्यालये यांच्या प्रमुखांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‘राज्य सांस्कृतिक समन्वय समिती’ स्थापन करण्यात येईल. या समितीची दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेण्यात येईल. या बैठकीत त्या संस्थांचे सुरू असलेले उपक्रम, प्रस्तावित उपक्रम, प्राधान्यक्रम इ. बाबत चर्चा होईल आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यात येईल. तसेच झालेल्‍या कामांचा आढावा घेण्‍यात येईल. ही समिती समन्वयाच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेईल.

२३. समित्यांवरील नियुक्त्या - सांस्‍कृतिक कार्य, भाषा व साहित्‍य, दृश्यात्‍मक कला, शिक्षण, उच्‍च शिक्षण आदी क्षेत्रांतील योजनांसाठी शासनाकडून नियुक्‍त करण्‍यात येणा-या समित्‍या सर्वसमावेशक असतील. समितीचा कालावधी तीन वर्षे वा त्यापेक्षा कमी असल्यास त्या समितीवर कोणत्याही अशासकीय सदस्‍याची/अध्यक्षाची नियुक्ती जास्तीत जास्त दोन वेळा आणि तो कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त असल्यास फक्त एकदाच करण्यात येईल.

२४. नियमित आढावा - सांस्‍कृतिक धोरणात समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या सर्व बाबींच्‍या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्‍यात येऊन कार्यवाहीला योग्‍य ती गती देण्‍यासाठी पावले उचलण्‍यात येतील. यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नियुक्‍त करण्‍यात येईल. या समितीत संबंधित विभागाचे मंत्री व राज्यमंत्री, तसेच काही अशासकीय सदस्य व मुख्‍य सचिव यांच्यासह वित्‍त (व्‍यय), पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य, शालेय व क्रीडा, उच्‍च व तंत्रशिक्षण इ. विभागांच्‍या सचिवांचा समावेश असेल. समितीची बैठक ३ महिन्‍यांतून एकदा होईल...

लोकसंस्कृती:
१. लोकसाहित्य समिती - लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकसाहित्य समितीला अधिक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या समितीचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल.

२. आदिवासी कोश - महाराष्ट्रातील आदिवासींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र अभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा हे कार्य पुणेस्थित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडे किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे सोपविण्यात येईल.

३. जाती-जमाती कोश - महाराष्ट्रातील विविध जातींचा आणि आदिवासींखेरीज इतर जमातींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र अभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'कडे हे काम सोपविण्यात येईल किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे हे कार्य सोपविण्यात येईल.(अंतीम आवृत्तीतून वगळले)

४. ग्रामीण जीवन कोश - शेती व तत्संबंधित पारंपरिक ग्रामीण जीवनाशी व व्यवसायांशी तसेच अन्य कारागिरांच्या व्यवसायांशी निगडित अनेक संज्ञा, संकल्पना आणि वस्तू काळाच्या ओघात लोप पावत चालल्या आहेत. अशा संज्ञा व संकल्पना यांचा सचित्र स्वरूपातील कोश तयार करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्य समिती’ वा तत्सम संस्था यांच्याकडे सोपविण्यात येईल.

५. स्थित्यंतरांचा इतिहास - एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात झालेल्‍या सामाजिक-सांस्‍कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास लिहिण्‍यात येईल. ‘राज्य साहित्य संस्कृती मंडळा’मार्फत हा प्रकल्प राबविण्यात येईल.

६. फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ - महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, कार्य आणि लेखन याबाबतची सामग्री प्रकाशित करण्यासाठी सध्या अस्थायी स्वरूपात तीन समित्‍या कार्यरत आहेत. या तिन्ही महामानवांच्या कार्यांत व विचारांत एकवाक्यता आहे. म्हणून तिन्ही समित्यांच्या कार्यात समन्वय असणे व्यवहार्य ठरेल. शिवाय, या समित्यांचे कार्य अधिक गतिमान करणे, या कार्यात एकसूत्रता आणणे आणि त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीसह व्यापक स्वरूपाची स्वतंत्र व स्थायी प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी ‘फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ’ स्थापन करण्‍यात येईल. या मंडळाच्या तीन समित्या मंडळाच्या अंतर्गत पण स्वतंत्रपणे कार्य करतील. त्‍यासाठी दरवर्षी गरजेनुसार स्‍वतंत्र आर्थिक तरतूद करण्‍यात येईल.

७. सण कोश - राज्‍यामध्‍ये वर्षभरात विविध सण साजरे केले जातात. काही सणांना विशिष्‍ट गाव, शहर, प्रादेशिक विभाग इ. ठिकाणचे स्‍थानिक वेगळेपण व महत्त्व असते. एकच सण वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, असेही घडते. हे सण हा सांस्‍कृतिक जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. म्‍हणून अशा सणांची माहिती कोशरुपाने प्रकाशित केली जाईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.

८. जत्रा आदींचे माहिती प्रकाशन - राज्‍यात गावोगाव विविध जत्रा, यात्रा, मेळे, उरूस, शीख समाजाचा हल्लाबोल, फेस्ता, फेअर इत्यादींचे आयोजन केले जात असते. या आयोजनांच्‍या प्रसंगी वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक सांस्‍कृतिक उपक्रम राबविले जातात. अशा प्रकारचे उपक्रम हे महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे. अशा जत्रा आदींचा परिचय करुन देणा-या जिल्हावार माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्‍यात येतील. या पुस्तिकांच्‍या आधारे त्‍यांचा राज्‍य पातळीवरील कोश तयार करण्‍यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.

९. जाती-जमाती भाषा कोश/संशोधन - महाराष्ट्रातील ज्या जाती-जमातींच्या मातृभाषा प्रमाण मराठीपेक्षा, मराठी बोलींपेक्षा अथवा हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू इत्यादी आधुनिक/अभिजात भाषांपेक्षा वेगळ्य़ा आहेत, त्यांच्या भाषांसाठी लिपी निश्चित करणे, कोश तयार करणे, तसेच त्यांचे मौखिक व लिखित साहित्य, रूढी, मिथके इत्यादींचे अध्ययन/संशोधन करणे इत्यादी उद्देशांनी कार्य करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य दिले जाईल.

१०. अन्य साहित्य संमेलने अनुदान - मुख्य मानल्या गेलेल्या प्रवाहापेक्षा वेगळ्या प्रवाहातील जनसमूहांच्या आणि उपेक्षित वर्गांच्‍या मराठी साहित्य संमेलनांनाही त्या त्या संमेलनाच्या एकंदर स्वरूपावर आधारित अनुदान देण्यात येईल. ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ या संदर्भात प्रस्ताव तयार करील.

११. ग्रामीण विद्यार्थी मार्गदर्शन - ग्रामीण भागांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना शहरी भागात वावरताना भेडसावणार्‍या समस्यांची माहिती देणारे आणि त्या समस्यांवर मात करण्याविषयी, तसेच त्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या अंगभूत क्षमतांचा विकास आणि गुणवत्‍तेचा आविष्‍कार करण्‍याविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण आवश्यक असते. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अशा प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याविषयी शैक्षणिक संस्थांना सांगण्यात येईल.

१२. अप्रयोगार्ह शब्द सूची - पूर्वी प्रचलित असलेले काही शब्‍द, वाक्प्रचार, म्‍हणी वगैरेंची प्रयोगार्हता आता वेगवेगळया कारणांनी कालबाह्य झाली आहे. आपले सार्वजनिक जीवन न्यायाधिष्ठित, संघर्षरहित, निकोप व अभिरुचिसंपन्न ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीने असे वाक्प्रयोग टाळता यावेत म्हणून शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, राजकीय नेते वगैरेंना अशा शब्‍दांची माहिती असणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी अशा शब्‍दांची सूची तयार करण्‍यात येईल. ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ सारख्या (‘यशदा’सारख्या) संस्थेमार्फत अशी सूची तयार करण्यात येईल. इतिहास, समाजशास्‍त्र, भाषाशास्‍त्र इत्‍यादी स्वरूपाच्या लेखनामध्‍ये अशा शब्‍दांचा निर्देश करणे अपरिहार्य असल्‍यास तो निर्देश अपवाद म्‍हणून आणि निकोप हेतूने केला जावा, अशी अपेक्षा असेल. अप्रयोगार्ह शब्‍दांची काही उदाहरणे परिशिष्ट क्रमांक २ मध्ये दिली आहेत.
ग्रंथसंस्कृती

१. कोश-आवृत्त्या - विषयवार परिभाषा कोशांच्या सुधारित व संवर्धित आवृत्त्या प्रकाशित करण्यात येतील आणि त्या मराठी भाषकांना सहज प्राप्त होतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. सर्व अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांना तसेच शाळा / महाविद्यालये / विद्यापीठे यांना हे कोश विकत घेणे बंधनकारक करण्यात येईल.

२. विश्वकोश प्रकल्पाला चालना –

२.१ विश्वकोशाचे जे नियोजित खंड अद्याप प्रकाशित झालेले नाहीत, ते लवकरच प्रकाशित केले जातील.

२.२ विश्वकोश मंडळाचे सर्व खंड युनिकोडमध्ये टंकलिखित करून संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करून देण्यात येतील. विश्वकोशातील माहिती अद्ययावत करण्यासाठी सूचना करण्याची अभ्यासकांना मुभा असेल. पण ही माहिती विश्वकोश मंडळाने मंजूर केल्यानंतरच अधिकृत स्वरूपात समाविष्ट केली जाईल.

२.३ पूर्वी प्रकाशित झालेल्‍या खंडांच्‍या नव्‍या आवृत्त्या तयार करताना त्‍यांच्‍यामध्‍ये नव्‍याने समाविष्‍ट करावयाच्‍या नोंदींची सूची करण्‍यासाठी योग्‍य ती यंत्रणा निर्माण करण्‍यात येईल.

२.४ विश्वकोश निर्मिती मंडळासाठी लेखन करणार्‍या लेखकांच्या/अभ्यागत संपादकांच्या /करारपद्धतीवरील कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. नोंदींचे काम तसेच प्रशासकीय काम करारपद्धतीने करून घेण्याची मंडळाला मुभा असेल. तसेच, आवश्यक असणारी व रिक्त असलेली स्थायी पदे त्वरित भरण्यात येतील. या सर्व बाबींसाठी शासन विश्वकोशाला भरीव स्वरूपात आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल.

३. मराठी शब्द व्युत्पत्ती कोश - अनेकदा शब्दांमध्ये सामाजिक/सांस्कृतिक इतिहास अप्रकट स्वरूपात पिढया-न्-पिढया टिकून राहिलेला असतो. अलिकडच्या काळात मराठीमध्ये विविध मार्गांनी अनेक शब्दांची भर पडली आहे. तसेच, भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र इ. क्षेत्रांत झालेल्या संशोधनामुळे शब्दांच्या नव्या व्युत्पत्ती समोर येऊ लागल्या आहेत. समाजातील ज्या घटकांच्या बोलींकडे पूर्वी फारसे लक्ष जात नव्हते, अशा घटकांच्या बोलींमधील शब्दांच्या व्युत्पत्तींचा शोध घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेतील शब्दांच्या व्युत्पत्ती देणारा एक अद्ययावत असा ‘मराठी शब्द व्युत्पत्ती कोश’ तयार करण्यात येईल. त्यासाठी एक मंडळ नेमून ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’मार्फत ही कार्यवाही करण्यात येईल.

४. दुर्मिळ ग्रंथ संचयिका - महाराष्ट्रातील संस्थांना/सार्वजनिक ग्रंथालयांना ३१ डिसेंबर १९०० या दिवशी अथवा त्यापूर्वी प्रकाशित झालेले ग्रंथ ग्रंथालय संचालनालयाच्या संमतीशिवाय निकालात काढता येणार नाहीत. जे ग्रंथ विशिष्ट कारणाने महत्त्वपूर्ण असतील, ते ग्रंथ निकालात काढण्याची परवानगी देण्यात येणार नाही. त्या ग्रंथांचे जतन करण्यासाठी ‘दुर्मिळ ग्रंथ संचयिका’ स्थापन करण्यात येईल. ही कार्यवाही करण्यासाठी ग्रंथालय संचालनालय तज्ज्ञांची समिती नेमेल.

५. दुर्मिळ ग्रंथ सूची - महाराष्ट्रात शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली सुमारे सव्वाशे ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांमध्ये आणि इतरही काही ग्रंथालयांमध्ये १ जानेवारी १९०१ पूर्वी प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आहेत. या ग्रंथालयांकडे/ व्यक्तिगत संग्रहांमध्ये असलेल्या अशा पुस्तकांचे तपशील मागवून घेण्यात येतील. महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषकांनी उभारलेली ग्रंथालये व इतर संस्था यांच्याकडे अशी पुस्तके उपलब्ध असतील, तर त्यांचाही तपशील मागवून घेण्यात येईल. ग्रंथालय संचालनालयामार्फत अशा ग्रंथांची सूची संशोधकांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल.

६. दुर्मिळ मराठी ग्रंथ संकेतस्‍थळावर - स्‍वामित्‍व अधिकाराची मुदत संपलेले अनेक मराठी ग्रंथ सध्‍या उपलब्‍ध होत नाहीत. अशा दुर्मिळ आणि महत्त्वाच्या ग्रंथांची सूची महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळामार्फत तयार करण्‍यात येईल. हे ग्रंथ स्‍वतंत्र संकेतस्‍थळावर सहज उपलब्‍ध होतील, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.

७. शासकीय प्रकाशने, छपाई व विक्री - ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’, ‘भाषा संचालनालय’, ‘राज्य मराठी विकास संस्था’ यांना तसेच ग्रंथ प्रकाशित करणार्‍या राज्य शासनाच्या कोणत्याही इतर यंत्रणेला सध्या शासकीय मुद्रणालयामधूनच ग्रंथ छापून घेण्याचे आणि या ग्रंथांची विक्री शासकीय ग्रंथविक्री भांडाराद्वारेच करण्याचे बंधन आहे. त्यामुळे या ग्रंथांची आवश्यक तेव्हा छपाई करून मिळत नाही तसेच, जनतेला हे ग्रंथ सुलभतेने मिळत नाहीत. या सर्व संस्थांना आपले ग्रंथ खाजगीरीत्या छापून घेण्याची आणि त्यांच्या विक्रीसाठी स्वत:ची यंत्रणा उभारण्याची मुभा असेल.

८. शासकीय ग्रंथ पुनर्निर्मिती – ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’, ‘भाषा संचालनालय’, ‘राज्य मराठी विकास संस्था’ वा अन्य शासकीय संस्था यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांची पुनर्निर्मिती करण्याचे अधिकार या संस्थांना असतील. या संस्था अशा ग्रंथांची पुनर्निर्मिती करणार नसतील आणि लोकांकडून अशा ग्रंथांची मागणी असेल, तर या संस्था हे ग्रंथ खाजगी प्रकाशकांना प्रकाशित करण्यासाठी देऊ शकतील.

९. ग्रंथांची शासकीय खरेदी – महाराष्ट्रात प्रकाशित होणार्‍या पुस्तकांच्या खरेदीसाठी ग्रंथालय संचालनालय राज्यातील ग्रंथालयांना अनुदान देते, त्याचप्रमाणे स्वत: ग्रंथ खरेदी करून ते ग्रंथालयांना वितरित करते. त्यासाठी ग्रंथ निवड समिती नियुक्त करण्यात येते. या निवड समितीच्या रचनेत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल. मान्यताप्राप्त ग्रंथालयांना परिरक्षण अनुदान देण्यात येते, त्यातून ५० टक्के खर्च वेतनावर व ५० टक्के खर्च वाचनसाहित्यासह वेतनेतर बाबींवर करण्यात येतो. या अनुदानाच्या रकमेत दरवर्षी ५ टक्के वाढ करण्यात येईल.
शासकीय भांडारे अधीक शहरात
थोर व्यक्तींची संक्षिप्त चरीत्रे

१०. ग्रंथोत्सव – राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ग्रंथोत्सव आयोजित करण्यात येईल. स्थानिक साहित्य संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी ग्रंथोत्सवाचे आयोजन करतील. प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांना ग्रंथविक्रीसाठी आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश असेल. शिवाय, या ग्रंथोत्सवाच्या अंतर्गत साहित्यविषयक उपक्रमही आयोजित करण्यात येतील. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’मार्फत जिल्हाधिकार्‍यांना अनुदान देण्यात येईल. महाराष्ट्राबाहेरील महत्त्वाच्या शहरांमध्येही मंडळ स्वत: अशा उपक्रमांचे आयोजन करील.
स्पर्धा परिक्षा संदर्भकक्ष

११. ग्रंथसंस्कृती जोपासना - राज्यात ग्रंथसंस्‍कृती वृद्धिंगत करण्‍याचे प्रयत्‍न केले जातील. महिन्यातून एकदोनदा एकत्र जमून ग्रंथचर्चा, ग्रंथसमीक्षण, साहित्यविषयक चर्चा इ. उपक्रम राबविणा-या संस्‍थांना राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत प्रोत्साहनपर अनुदान देण्‍यात येईल. राज्‍यात अशा संस्‍थांचे एक जाळेच निर्माण व्‍हावे, असे प्रयत्‍न केले जातील.

१२. वाङ्मय पुरस्कार निवड सुधारणा- राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणार्‍या वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या सध्याच्या निवडप्रक्रियेनुसार निवड समितीच्या अध्यक्षांच्या सल्ल्याने प्रत्येक लेखनप्रकारासाठी एक परीक्षक नेमला जातो आणि हा परीक्षक त्या लेखनप्रकारातील उत्कृष्ट पुस्तकांची निवड करतो. या निवडी त्या लेखनप्रकारासाठी परीक्षक म्हणून नेमलेल्या एका व्यक्तीच्या दृष्टीकोणापुरत्या मर्यादित राहू नयेत, म्‍हणून निवड समितीच्या अध्यक्षांसह समितीतील अन्य ५ ते ६ परीक्षकांनी सर्व पुरस्कारांची अंतिम निवड करावी, याकरिता निवडप्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल.

१३. इंग्रजी भाषेतील ग्रंथांना पुरस्कार – मराठी मातृभाषा असलेल्या व्यक्तींनी इंग्रजीमध्ये स्वतंत्ररीत्या लिहिलेल्या उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय पुरस्कार देण्यात येतील. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेतील ग्रंथव्यवहाराचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्‍यात येईल.

१४. भारतीय भाषांतील ग्रंथांना पुरस्कार - मराठी मातृभाषा असलेल्या व्यक्तींनी इंग्रजीखेरीज अन्य भारतीय भाषांमध्ये स्वतंत्ररीत्या लिहिलेल्या सर्जनशील व वैचारिक उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय पुरस्कार देण्यात येतील.

१५. अमराठी लेखकाला पुरस्कार - मराठीपेक्षा वेगळी मातृभाषा असलेल्या देशी/परदेशी लेखकांनी/संशोधकांनी मराठीत किंवा महाराष्ट्रविषयक लिहिलेल्या उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय पुरस्कार देण्यात येतील.

१६. ‘महाराष्ट्र’ वार्षिकी - केंद्र शासनाच्या ‘इंडिया’ या वार्षिकीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचा आढावा घेणारी वार्षिकी दरवर्षी प्रकाशित करण्यात येईल. या वार्षिकीत शासनाच्या विभागांशी संबंधित मूलभूत आकडेवारी आणि महत्त्वाच्या योजना यांची माहिती देण्यात येईल. त्याशिवाय जिल्हावार पुस्तिका नियमितपणे प्रकाशित करण्यात येतील.

१७. ‘लोकराज्य’-प्रादेशिक विभागांचा आढावा - ‘लोकराज्य’ या मासिकाचे स्वरूप महाराष्ट्राचे विविध विभाग, समाजाचे विविध स्तर, सामाजिक-सांस्कृतिक जीवनाची विविध क्षेत्रे इत्यादी अंगांनी सर्वसमावेशक करण्यात येईल. या मासिकात महाराष्ट्राच्या विविध भागांतील घडामोडींचा आणि घटनांचा विभागवार आढावा घेण्यात येईल. सर्व प्रादेशिक विभागांतील वाचकांना सर्व विभागांचा आढावा वाचता येईल, या पद्धतीने तो प्रत्येक अंकाच्या सर्व प्रतींतून प्रसिद्ध करण्यात येईल. ‘लोकराज्य’चे विशेषांक अधिक प्रमाणात प्रकाशित करण्यात येतील.
[संपादन]
बृहन्महाराष्ट्र

१. बृहन्महाराष्ट्र परिचय पुस्तिका - बृहन्महाराष्ट्रातील तसेच विदेशांतील मराठी भाषकांच्या संस्थांचे स्वरूप, उद्दिष्टे, कार्य इत्यादींचा परिचय करून देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. ‘राज्य मराठी विकास संस्था’ यासाठी योजना तयार करील व राबवील.

२. बृहन्महाराष्ट्र मंडळे साहाय्य - महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणार्‍या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल.

३. संस्‍कृती परिचय अभ्यासक्रम - अलिकडच्‍या काळात महाराष्‍ट्रीय व्‍यक्‍ती शिक्षण, नोकरी, व्‍यवसाय, वास्‍तव्‍य, पर्यटन इ. उद्देशांनी परप्रांतांत वा परदेशांत मोठया संख्‍येने जाऊ लागल्या आहेत. अशा उद्देशांनी प्रवास करणार्‍या व्‍यक्‍तींना त्‍या त्‍या ठिकाणची सांस्‍कृतिक मूल्‍ये, शिष्‍टाचार, कायदेकानून, वेशभूषा, संभाषणशैली, आहार, हवामान इत्यादींची योग्य ती माहिती असणे आवश्‍यक असते. तसेच, महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीविषयीही मूलभूत आणि वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक असते. सांस्कृतिक देवाण-घेवाण विधायक रीतीने होण्यासाठी आणि तिथल्या वास्तव्यात समायोजन होण्यासाठी अशी दोन्ही प्रकारची माहिती उपकारक ठरते. अशा प्रकारे अन्‍यत्र जाऊ इच्छिणा-या महाराष्ट्रीय/मराठी व्‍यक्‍तींना या बाबतीत मार्गदर्शन करण्‍यासाठी विद्यापीठ पातळीवर लघुमुदतीचे अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येतील.
[संपादन]
अनुवाद

१. मराठीचा वापर व दुभाषांची मदत - राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, तसेच विभागप्रमुख इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमांत बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी, विशेषत: परदेशांतील प्रतिनिधी यांच्या समवेत होणा-या अधिकृत बैठका/ कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची/ अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित होईल, मराठी भाषकांचे अनुवादकौशल्य विकसित करण्यासाठी चालना मिळेल आणि मराठी भाषकांना अनुवादक म्हणून व्यवसायही प्राप्त होईल.

२. अनुवाद प्रशिक्षण - मराठी-इंग्रजी, मराठी-हिंदी आणि इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी अशा अनुवादाच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सुरू करण्यात येतील. तसेच, अनुवादविषयक कार्यशाळा/ शिबिरे आयोजित करण्यात येतील. इतर भाषांच्या बाबतीतही आवश्यकतेनुसार शक्य तिथे असे प्रयत्न करण्यात येतील.

३. मराठी ग्रंथ अनुवाद प्रोत्साहन - मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषत: हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ’ / ‘मराठी भाषा विकास संस्था’ यांच्यामार्फत ग्रंथांतील मजकुराचा थोडक्यात सारांश आणि लेखकाचा परिचय हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अखिल भारतीय स्तरावरच्या सर्व भाषांमधील महत्त्वाच्या प्रकाशकांना पाठविण्यात येईल. येथून पुढे ज्या ग्रंथांना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येतील, ते ग्रंथ यासाठी निवडले जातील.

४. संतवचनांचे अनुवाद - महाराष्ट्रातील संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद देशातील भाषांमध्ये, तसेच परदेशांतील काही महत्त्वाच्या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येतील. महाराष्ट्राबाहेरील भारतीय संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद मराठी भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येतील.

५. इंग्रजी भाषेवर प्रभुत्‍व – सध्‍या इंग्रजी भाषेला वेगवेगळया कारणांनी जागतिक पातळीवर पूर्वीपेक्षाही अधिक महत्त्वाचे स्‍थान प्राप्‍त झाले आहे. विविध क्षेत्रात जगभर होणारे अत्‍याधुनिक संशोधन आणि इतर घडामोडी यांची माहिती त्‍वरित उपलब्‍ध होण्‍यासाठी, ती माहिती तत्‍परतेने मराठीमध्‍ये भाषांतरित करण्‍यासाठी, तसेच नोकरी, व्‍यवसाय इ. बाबतीत यश मिळविण्‍यासाठी मराठी भाषकांना इंग्रजी भाषा उत्‍तम रीतीने अवगत होणे गरजेचे झाले आहे. त्‍यांना लिखित व मौखिक इंग्रजीचे नीट आकलन, तसेच इंग्रजीमध्‍ये प्रभावी लेखन आणि प्रवाही संभाषण या मार्गांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्‍व प्राप्‍त करता यावे, यासाठी राज्‍य शासन विविध उपक्रम राबवील. शालेय आणि महाविद्यालयीन स्‍तरांवरील अध्‍यापनाबरोबरच बहिःशाल स्‍वरुपात इंग्रजीचे शिक्षण उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी संभाषणाचे वर्ग, अनुवादाच्‍या कार्यशाळा इ. उपक्रमांना शासन अर्थसहाय्य देईल.

अमराठी भाषकांसाठी उपक्रम१. अन्य भाषांसाठी अकादमी - महाराष्ट्र शासनाने हिंदी, गुजराती, सिंधी आणि उर्दू भाषांतील साहित्यासाठी चार स्वतंत्र अकादमी स्थापन केल्या आहेत. यांपैकी प्रत्येक अकादमीला दरवर्षी आवश्यकतेनुसार पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. या अकादमींची माहिती गुजरात शासनाला कळविण्यात येईल. गुजरात राज्याची मातृभाषा असलेल्या गुजराती भाषेची अकादमी महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली आहे, त्याच धर्तीवर गुजरात राज्याने मराठी अकादमीची स्थापना करावी, अशी विनंती गुजरात शासनाला करण्यात येईल. याच पद्धतीने हिंदी मातृभाषा असलेल्या राज्य शासनांना या अकादमींची माहिती कळवून त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मराठी अकादमीची स्थापना करण्याची विनंती करण्यात येईल.

२. अमराठी भाषकांसाठी प्रकाशने - मराठी भाषेखेरीज एखादी अन्य भारतीय/विदेशी भाषा ही ज्यांची मातृभाषा असेल, त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी आवश्यक अशा पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल. तसेच, त्या भाषांतील शब्दांचे मराठी अर्थ देणार्‍या आणि मराठी भाषेतील शब्दांचे त्या भाषांतील अर्थ देणार्‍या शब्दकोशांची निर्मिती करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल. या प्रकल्पासाठी आवश्यकता असल्यास परदेशस्थ महाराष्ट्रीय व्यक्तींचा/संस्थांचा आर्थिक व अन्य प्रकारचा सहभाग मिळविण्यात येईल. यासाठी आवश्यक ती योजना ‘राज्य मराठी विकास संस्था’ किंवा ‘राज्‍य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ तयार करील.

३. अमराठी भाषकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी – अमराठी भाषकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी शिकविण्याची सोय उपलब्ध करून देणार्‍या व्यक्तींना/संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल.

लेखन

१. युनिकोडचा अधिकृत वापर – संगणक माध्यमात देवनागरी लिपीच्या उपयोगाबाबत सर्वत्र एकवाक्यता नसल्याने मराठीतून संगणकीय संवाद साधण्यास मर्यादा येतात. म्‍हणून, जागतिक पातळीवर सर्व प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन युनिकोडच्या अंतर्गत विकसित केलेल्या देवनागरी लिपीच्या प्रमाणित संस्करणाचा शासनव्यवहारात अधिकृत वापर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शासन यांना संगणकाच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधणे सोपे होईल. आवश्यकता असल्यास संबंधितांकडून युनिकोडमधील त्रुटी दूर करण्यात येतील.


स्‍मारके आणि पुरस्कार:
समाजाला असाधारण योगदान देणार्‍या स्त्री-पुरुषांची मोठी मालिका महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झालेली आहे. अशा व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारणे वा त्यांच्या नावाने विशिष्ट पुरस्कार देणे होय.

१. स्मारक सल्लागार समिती - शासनातर्फे नवीन स्‍मारकांची निर्मिती करताना संबंधित स्‍मारकाची आवश्‍यकता, स्‍वरूप, जतन इत्यादी बाबींवर शासनाला सल्ला देण्यासाठी ‘स्‍मारक सल्लागार समिती’ स्‍थापन करण्‍यात येईल. स्‍मारकांचे स्‍वरूप स्‍मृतिदर्शक प्रतीकांच्‍या उभारणीबरोबरच अभ्‍यासकेंद्र, संशोधनकेंद्र, कलाकेंद्र, प्रशिक्षणकेंद्र इ. प्रकारचे रहावे, याची दक्षता घेण्‍यात येईल.

२. पुरस्‍कारांसाठी व्‍यापक प्रतिनिधित्‍व – राज्‍य शासनातर्फे दिल्‍या जाणा-या सन्‍मादर्शक पुरस्‍कारांसाठी निवड करताना, तसेच केंद्र शासनातर्फे दिल्‍या जाणा-या पुरस्‍कारांसाठी शिफारस करताना श्रेष्‍ठ गुणवत्‍ता, विशेष कर्तृत्‍व इ. बाबींबरोबरच विविध समाज घटकांचे आणि समाजजीवनाच्‍या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्‍व ही देखील कसोटी मानली जाईल.

३. यथोचित स्मरण – सर्वसामान्य, प्रसंगी उपेक्षित अशा विविध समाजघटकांतून पुढे आलेल्या आणि देदीप्यमान कर्तृत्व गाजविलेल्‍या व्‍यक्‍तींचा यथोचित सन्‍मान करणे हे शासनाचे सांस्‍कृतिक कर्तव्‍य आहे. येथून पुढे शासन नव्याने विविध पुरस्कार वा अन्य महत्त्वाचे उपक्रम सुरू करील, तेव्हा ज्‍या कर्तृत्‍ववान व्‍यक्‍तींची पुरेशी नोंद घेणे राहून गेले आहे, त्‍या व्‍यक्‍तींची नावे या पुरस्‍कारांना वा उपक्रमांना देण्‍यात येतील.

४. पुरस्कार निवडीच्या प्रक्रियेत बदल - विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्तींना महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिले जातात. काही पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्याची पद्धत असल्यास अशा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येणार नाहीत. पुरस्कारयोग्य व्यक्तींची निवड करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया अवलंबिण्यात येईल. वैधानिक संस्थांच्या सर्वोच्च पदांवर व्यक्तींची निवड करण्यासाठीही अर्ज मागविण्यात येणार नाहीत.

५. नावांचा योग्‍य वापर – स्‍मारके, पुरस्‍कार, सांस्‍कृतिक केंद्रे, विशिष्‍ट‍ संस्‍था, महत्त्वाच्‍या इमारती, महामार्ग व अन्‍य मार्ग, चौक इ.ना देण्‍यात आलेल्‍या नावांचे संक्षेप न वापरता ती नावे पूर्णपणे वापरली जातील, याविषयी दक्षता घेतली जाईल. हा उद्देश सफल होण्‍याच्‍या दृष्‍टीने अशा प्रकारची नावे देताना ती अनेक पदव्‍या वगैरेसह लांबलचक न होता सुटसुटीत असावीत, असा प्रयत्‍न राहील

आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना

एशियन  

स्थापन:- १९६७. आग्नेय आशियातील बिगर-साम्यवादी राष्ट्रांकडून स्थापना. एकमेकांच्या सहकार्याने आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्ट कंबोडियातून विएतनामी सेना माघारी बोलावण्यात संघटनेला यश (१९८९) सदस्य देश- बु्रनोई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स, सिंगापुर, थायलंड, कंब्रोडिया, म्यानमार, व्हिरतनाम, लाओस, मुख्य कचेरी : जकार्ता (इंडोनेशिया)


कॅरिकॉम 

स्थापना १९७३. व्यापार, परराष्ट्रीय व्यवहार, सामाजिक प्रगती यांचा संयुक्ितक विकास करण्यासाठी कॅरिबियन समुद्रातील छोटया राष्ट्रांव्दारे स्थापना. एकुण १४ सदस्य देश. मुख्य कचेरी : जॉर्ज टाऊन (गियाना)


कोलंबो प्लॅन :

द. व आग्नेय आशिया तसेच पॅसिफिक विभागासाठीचा आर्थिक विकासाचा आराखडा. स्थापना १९५०. सुरूवातीला ७ सदस्य राष्ट्रे. सध्याची सदस्य संख्या २१. अफगाणिस्तानपासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपर्यंत (भारतासह) सर्व देश सदस्य असून कॅनडा, जपान, अमेरिका, ब्रिटन हे या विभागात नसलेले पण विकासासाठी भांडवल पुरवणारे देशही सदस्य आहेत. मुख्य कचेरी : कोलंबो (श्रीलंका)


राष्ट्रकुल परिषद (कॉमनवेल्थ) :

जगातील सर्वात मोठे व व्यापक संघटना. स्थापना १९२३ 'ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वायत्त समुह' अशी सुरूवातीची संकल्पन. सध्या एकुण ५३ सदस्य राष्ट्रे. यातील निम्मी स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्रे आहेत. तर फक्त १८ सदस्य राष्ट्रेच इंग्लंडच्या राणीला राज्य प्रमुख म्हणून मानतात. द. आफि्रका (१९६१) व पाकिस्तान (१९७२) यांनी राष्ट्रकुलाचा राजीनामा दिला होता. पण यावर्षी (१९८९) क्वालालंपुर येथे झालेल्या राष्ट्रकूल प्रमुखांच्या परिषदेत पाकिस्तानला पुन:प्रवेश देण्यात आला दर वर्षांनी राष्ट्रकूल स्पर्धाही (ऑलिम्पिकच्या धर्तीवर) होत असतात. १९९९च्या लष्करी उठावामुळे पाकिस्तानला या संघटनेतून पुन: एकदा बाहेर काढले आहे. लष्करी उठावामुळे नायजेरियाकला सुध्दा या संघटनेबाहेर जावे लागले.


कॉमेकॉन  

स्थापना १९४९. रशिया व तिच्या साम्यवादी मित्र राष्ट्रांची प्रमुख आर्थिक संघटना. रशिया बल्गेरिया, हंगेरी, पोलंड, रूमानिया (संस्थापक सदस्य) इतर सदस्य: पूर्व जर्मनी, मंगोलिया, क्युबा व विएतनाम मुख्य कचेरी : मॉस्को, सध्या अस्तित्वहीन.


युरोप ी य समुह 

युरोपीयन आर्थिक समुह(श्र्छछ)- स्थापना १९५८. युरोपीय अणुऊर्जा समुह(श्र्ुरात्ेम्)स्थापना १९५८ आणि युरोपीय कोळसा व पोलाद समुह (श्र्च्स्च् स्थापना १९५३) या तिन्ही समुहाचे एकत्रीकरण होऊन १९६७ युरोपीयन समुह अस्तित्वात यातील श्र्श्र्छची उद्दिष्टे : सदस्य राष्ट्रात मुक्त आयात-निर्यात व्यापार वाढवणे, शेती संदर्भात एकच संयुक्त धोरण ठेवणे. विनियम दर स्थिर ठेवणे इ. उद्दिष्टे नवीन समुहातही कायम ठेवण्यात आली. सध्या पश्चिम युरोपातील १२ राष्ट्रे सदस्य आहेात. बेल्जियम, हॉलंड, लक्झेम्बर्ग, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन, डेन्मार्क, आयर्लंड, ग्रीस, स्पेन व पोर्तुगाल. सदस्य राष्ट्रांची मंत्री परिषद, युरोपीय संसद, युरोपीय न्यायालय इ. समुहाच्या संस्था. मुख्य कचेरी : ब्रुसेल्स (बेल्जियम)


युरोपीयन मुक्त व्यापार संघ  

स्थापना १९६०. प्रशुल्क मुक्त व्यापार करण्याच्या उद्देशाने सुरूवातील सात देशांमार्फ़त स्थापना. ब्रिटन डेन्मार्क व पोर्तुगालने नंतर सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सध्या ऑस्टि्रया, नॉर्वे, स्वित्झर्लंड, स्वीडन, आइसलंड व फिनलंड ही सहाच सदस्य राष्ट्रेश्र्फ्अट व श्र्श्र्छ यांच्यातील करारानुसार सध्या या दोन्ही समुहातील सदस्यराष्ट्रात मुक्त व्यापार होऊ लागला आहे.


अरब लीग   

स्थापना १९४५. सुरूवातीला ७ अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन मुख्यत: राजकीय कारणासाठी स्थापन. सध्या २१ सदस्य. आफ़्रिकेतील मोरोक्कोपासून आशियातील ओमनपर्यंत बहुतेक सर्व अरब राष्ट्रे सदस्य आहेत. मुख्य कचेरी : टयुनिस.


नाटो  

स्थापना १९४९. पाश्चिमात्य राष्ट्रांचे प्रमुख लष्करी संघटन. एकुण सदस्य राष्ट्रे- १९. अमेरिका, कॉनडा, आईसलंड, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, लक्झेम्बर्ग, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, डेन्मार्क, मूळ संस्थापक संद्रस्य. प. जर्मनी. स्पेन, ग्रीस व तर्कस्तान यांना नंतर सभासदत्व देण्यात आले. पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हिया यांना १९९९ मध्ये प्रवेश दिला गेला. रशिया व मित्र राष्ट्रांच्या संभाव्या आक्रमणाला उत्तर म्हणून 'नाटो' ची स्थापना. मुख्य कचेरी: बु्रसेल्स.


अमेरिकन राष्ट्र संघटन  

स्थापना- १९४८. उत्तर मध्य व दक्षिण अमेरिकेतील ३० सदस्य राष्ट्रे. मूळ उद्दिष्ट- प्रादेशिक सुरक्षितता आणि स्वातंत्र्य कायम राखणे. आर्थिक व सामाजिक विकासाच्या प्रचालनावर भर. मुख्य कचेरी : वॉशिंग्टन.


पेट्रोल निर्यातदार राष्ट्रांची संघटना  

स्थापना- १९६० खनिज तेल निर्माण करणार्‍या राष्ट्रांचे हितसंबंध जपणे हे उद्दिष्ट. १९७० ते १९८० या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढवण्यास ही संघटना असमर्थ ठरली. या संघटनेची सदस्य नसलेल्या अमेरिका, ब्रिटन, मेक्िसको व नॉर्वे यांच्या वाढत्या तेलउत्पादनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या किंमतीवर मोठा परिणाम. यामुळे 'ओपेक'चे महत्त्व घटले. एकुण सदस्य संख्या : १३ (बहुतेक सदस्य मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रे). मुख्य कचेरी : व्हिएन्ना (ऑस्टि्रया).


दक्षिण पॅसिफिक फोरम :

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण पॅसिफिकमधील अनेक लहान राष्ट्रे मिळून १३ सदस्य राष्ट्रे. प्रादेशिक राजकीय व आर्थिक हितसंबध जपणे हे प्रमुख उद्दिष्ट. फ्रान्सच्या द. पॅसिफिकमधील अणुचाचण्यांना जोरदार विरोध. मुख्य कचेरी : सुवा (फिजी)


वॉर्सा :

स्थापना १९५५. रशिया व पूर्व युरोप साम्यवादी गटातील राष्ट्रांचे संघटन. नाटोच्या धर्तीवरील करार. परस्पर सहकार्य प्रादेशिक सुरक्षितता व स्वातंत्र्त अबाधित राखण ही उद्दिष्टे. रशिया बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड, युगोस्लाविया सदस्य नाही. मुख्य कचेरी : मॉस्को. १९९० मध्ये या संघटनेचे विसर्जन झाले.


दक्षिण आशियाई प्रादेशिया सहकार्य संघ-सार्क 

दक्षिण आशियाई देशात आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवून प्रादेशिक शांतता व सामंजस्यता कायम टिकवण्यासाठी स्थापन झालेली संघटना. भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, भूतान, श्रीलंका, आणि मालदीव हे सात देश 'सार्क'चे सदस्य. डिसेंबर १९८५ मध्ये ढाक्यात पहिले अधिवेशन व स्थापना.


आफि्रकी एकता संघटना  

१ मे १९६३ रोजी आदिस अबाबा येथे ३० आफि्रकी देशांनी एकत्र येऊन स्थापना केली. आफि्रकी राष्ट्रातील एकता व सार्वभौमता कायम राखणे. वसाहतवादाचे उच्चाटण इ. मुख्य उद्दिष्टे. मुख्यालय : आदिसा अबाबा.


फ्रेंच राष्ट्रकूल :

स्थापना १९५३. ब्रिटिश राष्ट्रकुलाच्या धर्तीवर फ्रेंच साम्राज्यांतर्गत निर्माण झालेली संघटना. फ्रान्ससह फ्रान्सच्या जगभर पसरलेल्या वसाहती व ८ आफि्रकी सार्वभौम राष्ट्रे संघटनेचे सभासद आहेत. मुख्यालय : पॅरिस.


अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल :

स्थापना २८ मे १९६१ ब्रिटिश वकील पीटर बेरेन्सन याने पुढाकार घेऊन ही संघटना स्थापन केली. मूलभूत मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी झगडणारी आंतरराष्ट्रीय संघटना. या संघटनेचे १५०हुन अधिक राष्ट्रात पाच लाखाहून अधिक सदस्य आहेत. १९७७ चा नोबेल पुरस्कार या संघटनेला मिळाला होता. मुख्यालय : लंडन.


इंटरपोल :

स्थापना : १९२३ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुध्दच्या कामात विविध राष्ट्रांतील पोलिस दलात परस्पर सहकार्य व समन्वय साधणारा आंतरराष्ट्रीय पोलिस आयोग. मुख्यालय : पॅरिस, सदस्य संख्या : १३८.


रेड क्रॉस :

स्थापना मे १८६३, लढाईत वा भूकंपासारख्या अनर्थात जखमी झालेल्यांची देखभाल करणारी आंतरराष्ट्रीय संस्था, संस्थापक : हेन्री डयुनाट, लाल क्रास (बेरजेची खुण) १४५ देशात संस्थेच्या शाखा. २५ कोटींहून अधिक सभासद संख्या. आतापर्यंत तीनवेळा नोबेल पुरस्कार. १९१७, १९४४, १९६३. मुख्यालय : जिनेव्हा.


जी-८ समुह :

स्थापना १९८५. जगातील प्रमुख औद्योगिक लोकशाहीप्रधान राष्ट्रांच हा समुह. जागतिक अर्थव्यवस्था आणि संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठका. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका ही सात मूळ संस्थापक राष्ट्रे. रशियान नंतर प्रवेश देऊन मूळचे नाव बदलून जी-८ हे नाव धारण केले.


जी-२० :

जी ८ संघटनेच्या सदस्यांनी ही संघटना नव्यानेच स्थापली. जगातील अर्थकारणात भारताचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन भारताला या संघटनेने सदस्यत्व दिलेे आहे.

जी-१५ :

अ‍ॅफ्रो एशियन लॅटिन अमेरिकन देशांमधला विकसनशील देशांचा हा समुह. १९९० मध्ये मलेशियात स्थापना. सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक सहकार्य हा मूळ उद्देश. सुरूवातीला असलेली १५ सदस्य संख्या वाढून आता १९ झाली.

डी-८ :

विकसनशील ८ देशांचा हा समुह. ही सर्व प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्रे आहेत. स्थापना १९९७. या भागात असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय संघटनांना सहकार्य करणे असा मुख्य उद्देश. इजिप्त, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया हे सदस्य देश.


अलिप्त राष्ट्र परिषद :

जगातील सुमारे ११४ विकसनशील देशांचा हा समुह. १९५५ साली बांडुंगा येथे भरलेल्या बैठकीत प्रथम अलिप्तवादाची तज्ञ्ल्त्;वे निश्चित केली आणि १९५६ साली युगोस्लाव्हियामध्ये भरलेल्या परिषदेत ती मान्य करण्यात आाली. पं. नेहरू, मार्शल ट्टिो, प्रेसिडेंट नासर हे प्रमुख संस्थापक. बेलग्रेड येथे १९६१ मध्ये भरलेल्या पहिल्या अलिप्त राष्ट्र संघटनेत २५ सदस्य राष्ट्रे सहभागी झाली होती. जागतिक शांतता, नि:शस्त्रीकरण, विकासाभिमुख राष्ट्रीय धोरण, गरीबीचे उच्चाटन, निरक्षतेविरुध्द लढा इत्यादी प्रमुख तत्त्वांचा पाठपुरावा करण्यावर मुख्य भर.


अंटार्क्टिका करार :

सुरूवातीला डिसेंबर १९५९ मध्ये १२ देशांनी केलेला हा करार. सध्या ३९ देश या करारात सहभागी झाले आहेत. अंटार्क्टिका समुद्र हा प्रामुख्याने शांतता, शास्त्रीय संशोधन यासाठीच राखीव असावा हा मुख्य उद्देश. १९९१ मध्ये या प्रदेशात खनिजांसाठी उत्खननावर बंदी घालण्यात आली. दक्षिण गोलार्धातील ६० अंक्षाशा पलिकडील भूभाग या कराराव्दारे सुरक्षित करण्यात आला.


हिंदी महासागर सदस्य देश :

१९९७ मध्ये हिंदी महासागराच्या काठावरील सुमारे १४ देशांनी परस्पर सहकार्यासाठी ही संघटना स्थापली. जगातील सुमारे १/३ लोकसंख्या या महासागराभोवतीच्या देशांमध्ये सामावली आहे. विविध धर्म, भाषा, विविध प्रकारची राजकीय व्यवस्था असलेले हे देश. आर्थिक सहकार्य, पर्यटन, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण इ. बाबतीत सहकार्य करतील.

(source :http://www.balaee.com/)

December 22, 2010

Question and answers : State prilim exam 2011

 १) ग्रामीण भागात स्वयंपाकाचा गॅस (LPG) च्या उपयोगात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने कोणती 57;ितरण योजना तयार केली आहे? - राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरण योजना २) संयुक्त राष्ट्र स 06;घाच्या कृषी व खाद्य विभागाच्या रिपोर्टनुसार भारत किती कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे? - २५ ३) शासनाने सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना मजुरी ६६ रु. ऐवजी किती किमान रु. मजुरी दिली जाणार आहे? - १०० रु. ४) केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? - राळेगणसिद्धी ५) ४७ वे राज्य चित्रपट पुरस्कार- २०१० मधील राज कपूर स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? - मनोजकुमार ६) बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? - शेख मुजीब-उर-रहमान ७) २०१६ चे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले? - 48;्राझील ८) जागतिक आले उत्पादनात भारताने डिसेंबर २०१० मध्ये कितवा क्रमांक मिळविला आहे? - प्रथम ९) राज्य शासनाकडून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी दिला जाणारा ‘वनश्री पुरस्कार’ हा २०१० चा कोणाला देण्यात आला? - आर्यन फाऊंडेशन १०) ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदावर प्रथमच महिला राष्ट्रपती दिलमा रोऊसेफ यांची निवड झाली. ते त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार आहेत? - वर्कर्स पार्टी ११) केंद्र सरकारने कोणत्या प्राण्यास ऑक्टोबर २०१० मध्ये राष्ट्रीय विरासत म्हणून घोषित केले आहे? - हत्ती १२;) फोर्ब्सच्या भारतातील प्रमुख ग्रामीण उद्योजकांच्या यादीत किती ग्रामीण शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे? - सात १३) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा यासाठी राज्यात कोणत्या प्रणालीचा उपयोग २०११-१२ मध्ये करण्यात येणार आहे? - ई-व्होटिंग १४) जागतिक पहिला विश्व सांख्यिकी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला? - २० ऑक्टोबर १५) भारत-ब्रिटन यांचा संयुक्त वायुसैनिकी अभ्यास प. बंगाल येथे पार पडला. या अभ्यास मोहिमेला काय नाव देण्यात आले? - इंद्रधनुष्य १६) सन २०१० चा अनंत भालेराव पुरस्कार कोणाला देण्यात आला? - ना. धों. महानोर १७) फॅशन जगतामध्ये अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल फ्रान्सचा प्रतिष्ठित नागरी सम्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? - रितु बेरी (भारत) १८) भारत सरकारने अपंगांसाठी विमा योजना चालू केली आहे या योजनेला देण्यात आलेले नाव - निर्भय योजना १९) जानेवारी २०११ मध्ये होणाऱ्या जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? - डॉ. विजय भटकर २०) चीन येथे २०१० मध्ये पार पडलेल्या १६ व्या आशियाई स्पर्धेचे शुभंकर काय ठरविण्यात आले आहे? - पाच बकरींचा समूह २१) संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या परिषदेवर भारताची दोन वर्षांकरिता निवड झाली आहे? (अस्थायी स्वरूपात) - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद २२) भारत-जर्मनी यांच्या मैत्रिचे प्रतीक म्हणून २०१२-१३ हे जर्मनीमध्ये काय म्हणून साजरे करणार आहे? - भारत वर्ष २३) परदेशात गांधीवादी तत्त्वे व मूल्ये यांचा प्रसार करण्यासाठी देण्यात येणारा जमनालाल बजाज पुरस्कार कोणाला देण्यात आला? - लिया दिस्किन (ब्राझील) २४) पाणी हे ज 68;वन आहे सांगून संयुक्त राष्ट्र संघाने २००५-२०१५ हे दशक काय म्हणून घोषित केले आहे? - पाणी दशक वर्ष २५) राष्ट्रकुल स्पर्धेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूचा ‘डिक्सन पुरस्कार’ हा कोणाला प्रदान करण्यात आला? - ट्रेसिया स्मिथ (जमैका) २६) भारतीय रिझव्‍‌र्ह ब 05;केने कोणत्या रकमेच्या नोटा हे प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे? - १० रु. २७) गोवा येथे पार पडलेल्या ४१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या मराठी चित्रपटाने स्थान मिळविले? - विहीर २८) सन २०१० चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? - लुईस इनासिओ तुलाडासिल्वा २९) वैश्विक पवन ऊर्जा परिषदेच्या आकडेवारीनुसार पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? - पाचवा ३०) विदर्भातील तीन व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष - डॉ. पी. सी. कोतवाल ३१) महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे १७ वे अधिवेशन उद्घाटक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? - डॉ. जब्बार पटेल ३२) पुलोत्सव कृतज्ञता सम्मान हा पुरस्कार कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांस जाहीर झाला आहे? - सिंधुताई सकपाळ ३३) भारताने शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी एप्रिल २०१० रोजी कोणत्या देशाबरोबर करार केला? - ऑस्ट्रेलिया ३४) मुंबईच्या फाळके अकादमीतर्फे देण्यात येणारा फाळके रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? देव आनंद ३५) देशातील पहिले होमिओपॅथिक विश्वविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? - राजस्थान ३६) देशातील पहिले गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? - महाराष्ट्र ३७) बाराव्या ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटास सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला? - मेजॉरिटी ३८) सन २०१० चा बुकर पुरस्कार हा कोणत्या लेखकास देण्यात आला? - हॉर्वर्ड जेकबसन ३९) भारतातील पहिले बायोटेक विश 75;ष आर् 41;िक क्षेत्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? - हडपसर (पुणे) ४०) देशातील पहिले होमिओपॅथिक विश्वविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? - राजस्थान ४१) जागतिक आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिवस कोणता आहे? - २१ ऑक्टोबर ४२) सवाई गंधर्व महोत्सव पुण्याऐवजी या वर्षी कोठे पार पाडण्यात आला? - मुंबई ४३) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ‘ना उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आला आहे? - रायगड ४४) १७ सप्टेंबर २०१० मध्ये कोणत्या दोन देशांदरम्यान गोलमेज संमेलन संपन्न झाले? - भारत-कॅनडा ४५) अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ कोणाला देण्यात आला? - शं. ना. नवरे आणि मंगला संझगिरी ४६) एन.डी.टी.व्ही. प्रॉफ;िट अ‍ॅवॉर्डतर्फे देण्यात येणारा ‘ 25;्रिएटिव्ह एन्टरटेन्मेंट ऑफ द इयर’चा पुरस्कार हा कोणाला मिळाला? - आमिर खान ४७) १६ वे नवोदित मराठी साहित्य संमेलन कोठे भरविण्यात आले होते? - संगमनेर ४८) ‘राजीव गांधी कला पुरस्कार’ हा कोणाला देण्यात आला? - सचिन खेडेकर ४९) अखिल भारतीय 50;राठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘संत तुकाराम साहित्य गौरव पुरस्कार’ कोणाला देण्यात आला? - कवी आकाश सोनवणे ५०) स्पेनला भेट देणारी पहिली भारतीय राष्ट्रपती? - प्रतिभाताई पाटील ५१) उत्तराखंड राज्याने गंगा नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी कोणत्या अभियानाची सुरुवात केली आहे? - स्पर्श गंगा अभियान ५२) बहुप्रत्यक्षित मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुविधा सर्वप्रथम कोणत्या राज्यात राबविली जाणार आहे? - हरयाणा ५३) केंद्र सरकारने २२ जून २००९ मध्ये कोणत्या पार्टीला ‘उग्रवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे? - भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) ५४) देशात प्रतिबंधित करण्यात आलेली भारतीय कम्युनिस्ट पार्टी ही कितवी प्रतिबंधित पार्टी आहे? - ३५ वी. ५५) कोणता राष्ट्रीय पक्ष २०१० हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे? - बहुजन समाज पक्ष ५६) PCLV-C-14 द्वारा किती विदेशी नॅनो सॅटेलाइट अव;काशात पाठविण्यात आले? - सहा ५७) महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे झपाटय़ाने निकाली काढण्यासाठी किती विशेष न्यायालया 30;ी स्थापना करण्यात आली आहे? - १२ ५८) भारताचा ४० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? - I can't live without you ५९) देशातील महिला साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन हाती घेतले आहे? - साक्षर भारत मिशन ६०) कोणत्या दोन राज्यांमध्ये सन २०१० मध्ये पंचायत राजमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करणार आहे? - राजस्थान व केरळ ६१) जैन बंधू प्रभावती पत्रकारिता पुरस्कार २०१० कोणाला जाहीर करण्यात आला? - उत्तम कांबळे ६२) किसन गंगा प्रकल्प कोणत्या राज्यात साकारला जात आहे? - जम्मू-काश्मीर ६३) ६-१४ वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या नियमात केंद्र-राज्य यांचा खर्चाचा हिस्सा कसा असेल? - ६५:३५ ६४) विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? - राजाभाऊ शिरगुप्पे ६५) हैदराबाद येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बाल फिल्मोत्सवाला काय नाव देण्यात आले आहे? - ग्लोबल एलिफंट महोत्सव ६६) वेलु पिल्लई प्रभाकरनचा मृत्यू झाल्यानंतर लिट्टेचा कार्यकारभार कोणी सांभाळला? - सेलेवसा पद्मनाथन ६७) नेपाळच्या नवीन पंतप्रध 66;नपदी यांची निवड करण्यात आली. - माधव कुमार नेपाळ ६८) देशात कोणत्या राज्याने आर्थिक गुंतवणुकीत प्रथम क्रमांक पटकावला? - महाराष्ट्र ६९) सन २०१३ मध्ये कुंभमेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? - अलाहाबाद ७१) महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरा करण्यात ये 40;ो? - २० ऑगस्ट ७१) इंटरनेटवरील अश्लील साइट्सला बंदी घालणारी चीनमधील योजना कोणती? - ग्रीन डॅम ७२) ग्रामीण विकास मंत्रालयाने सुवर्णजयंती ग्रामविकास योजनेस दिलेले नवीन नाव कोणते? - राष्ट्रीय आजिविका मिशन ७३) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या वतीने ‘हॉल ऑफ फेम’मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली? - कपिल देव ७४) 60;प्टें. २००९ मध्ये इंटरनेट सुविधाला किती वर्षे पूर्ण झाली? - ४० वर्षे ७५) चिनी नागरिकांच्या मते सर्वात प्रभावशाली परदेशी नेत्यांमध्ये समाविष्ट असलेले दोन भारतीय नेते कोण आहेत? - रवींद्रनाथ टागोर व पं. जवाहरलाल नेहरू ७६) आरोग्य सेवा मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे विधेयक मांडणारे राज्य कोणते? - आसाम ७७) राष्ट्र मंडलाच्या शिखर संमेलनामध्ये कोणत्या देशाला समावेश हा राष्ट्र मंडल सदस्य म्हणून घेण्यात आले? - रवांडा ७८) युरोपियन संघच्या सोबत कोणत्या देशाची पहिली शिखर परिषद संपन्न झाली? - पाकिस्तान ७९) युरो (एवफड) या चलनाचा वापर करणाऱ्या देशांची संख्या किती आहे? - १५ देश ८०) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (EURO) सर्वाधिक रऊफ असणारा देश कोणता? - अमेरिका ८१) न्यू जर्सी येथील पहिले विश्व मराठी नाटय़ संमेलन- २०१० चे अध्यक्ष कोण आहेत? - रामदास कामत ८२) हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा- २०१४ कोठे भरविण्यात येणार आहे? - सोची (रशिया) ८३) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य पाच देश कोणते? - अमेरिका, रूस, फ्रान्स, ब्रिटेन, चीन ८४) भारतातील पहिले हरित शहर म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली? - आगरतळा ८५) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार- २००८ चे मानकरी कोण आहेत? - अख्तर खान शहरयार ८६) पंचायत राज यशस्वी पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या दोन राज्यांना देण्यात आला? - केरळ व कर्नाटक ८७) सन २०१० मध्ये महिला वर्ल्ड कप टी-२० मध्ये सर्वात जलद शतक कोणत्या खेळाडूने पूर्ण केले? - लिझा स्थालेकर (ऑस्ट्रेलिया) ८८) सन २०१० चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आला? - जगन्नाथ महाराज पवार ८९) लव इन रिलेशनशिपअंतर्गत सोबत राहणाऱ्या दाम्पत्या 40;ील जोडीदारांनी किती निकष; पूर्ण केले असतील तर महिलेस पोटगी मिळेल? - चार निकष ९०) भारतातील कोणत्या राज्याने मतदान करणे अनिवार्य आहे असे घोषित केले आहे? - गुजरात ९१) १६ वर्षांखालील मुलांना मोबाईल फोन विकणे, तसेच शाळा व कॉलेजमध्ये मोबाईल वापरावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे? - कर्नाटक ९२) लिब;ेरा पीपल्स चॉइसचा आशियाई पुरस्कार हा २०१० चा कोणाला देण्यात आला? - सचिन तेंडुलकर ९३) भारतीय योजना आयोगाच्या ‘भारत दृष्टी २०२०’ चा मुख्य उद्देश काय आहे? - जगात अत्यधिक महत्त्वाची आर्थिक ताकद बनविणे ९४) दिल्ली येथे पार पडलेल्या १९ व्या राष्ट्कुल स्पर्धेमध्ये तीनही पदके (सुवर्ण, रौप्य, कांस्य) कोणत्या खेळामध्ये भारताने जिंकले? - थाळिफेक. ९५) सन २०१० चा आशियाई सर्वश्रेष्ठ वित्तमंत्रीचा पुरस्कार हा कोणास देण्यात आला आहे? - प्रणव मुखर्जी ९६) देशातील कोणत्या राज्याचे स्थानिक उत्पन्न (GSDP) चा वृद्धिदर सर्वाधिक आहे? - छत्तीसगढ. ९७) जी-२० राष्ट्रांचे वित्तमंत्री समूहाचे दोन दिवसीय सम्मेलन ऑक्टोबर २०१० मध्ये कोठे पार पडले? - द. कोरिया. ९८) राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व BPL धारकांना किंवा कुटुंबीयांना लाभ देणारे पहिले राज्य कोणते? - हरियाणा. ९९) शिक्षणाच्या हक्कासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? - किशोर सिंग. १००) चालू वर्षी २०१० मध्ये भारताचा आर्थिक वृद्धिदर हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार किती टक्के असेल? ९.७ टक्के.

शास्त्रज्ञ


ह्युगो दि फ्रीस

:चार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले.

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल:
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२) यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी.बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसर्‍या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली.

दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आल

जानकी अम्मल:
एडवालेथ कक्कट जानकी अम्मल या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ होत. जन्मः इ.स. १८९७ मध्ये केरळ येथिल वेलीचेरी मध्ये. मृत्यु: इ.स. १९८४. इंग्लंड येथे कार्यरत असतांना, वनस्पतीशास्त्रातील ज्ञान आणि कार्य यांची महती ऐकून स्वत: जवाहरलाल नेहरूंनी तिला भारतात परत येऊन ‘बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ची पुनर्रचना करण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार त्या भारतात आल्य

इ.स. १९२५ बार्जुर शिष्यवृत्ती मिळवून मिशिगन अमेरिका येथून एम.एस्सी. पदवी घेऊन ती भारतात परत.
इ.स. १९३१ पुन्हा मिशिगनला उच्चशिक्षण व तेथून डॉक्टर ऑफ सायन्स ही उच्च पदवी घेऊन भारतात परत.
इ.स. १९४० लंडनच्या ‘जॉन इन्स हॉर्टिकल्चरल इन्स्टिटय़ूट’मध्ये वनस्पती-पेशी संशोधन उपशास्त्रज्ञ म्हणून काम केले.
इ.स. १९४५ पासून इ.स. १९५१ पर्यंत विल्से येथील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीत वनस्पतीपेशी-शास्त्रज्ञ म्हणून काम केले.


इ.स. १९४५ इंग्लंडमध्ये उद्यान वनस्पतींच्या पेशींतील गुणसूत्रांचा अभ्यास केला व त्यानुसार साली ‘क्रोमोसोम अ‍ॅटलास ऑफ गार्डन प्लांट्स’ हा प्रबंध सी. डी. जर्लिग्टन यांच्या साह्याने प्रसिद्ध केला.
पुरस्कार-
-इ.स. १९५७ पद्मश्री
युनिव्हॅर्सिटी ऑफ मिशिगन पुरस्कार

December 20, 2010

सर्वसाधारण माहिती:महाराष्ट्र (MPSC-PREPARATION )

मेळघाट अभयारण्य
महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्य़ाघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे.
---
बीड कनकालेश्वर् मन्दिर परळी वैजनाथ-बारा ज्योतिर्लिन्गापैकि यक्(जिल्हा-बीड)
शेगाव येथे संत श्री गजानन महाराज समाधि आहे. सिंदखेडराजा येथे छत्रपति शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाउचा जन्म झाला.

लोणार येथे उल्कापातामुळे तयार झालेले जगप्रसिध्द सरोवर आहे.(बुलढाणा जिल्हा)

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग "नागनाथ" हे पांडवकालीन मंदिर आहे(हिंगोली जिल्हा)

सिंहगड-पुण्यापासून अंदाजे ३०-३५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला नावाप्रमाणेच भक्कम आहे. तानाजी मालुसरे यांच्या सिंहासारख्या कामगिरीमुळे मूळच्या कोंडाणा किल्ल्याचे नाव 'सिंहगड' झाले. गडावरील देव टाके थंड आणि गोड पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गडावर राजाराम महाराज यांची समाधी आणि तानाजी मालुसरे यांचे स्मारक आह

भुलेश्वर:पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. वर भुलेश्वर हे देवस्थान आहे. हे बहुधा पांडवकालीन असावे. मूर्तिकाम पाहण्यासारखे आहे. लढायांच्या धामधुमीत बर्‍यायाच मूर्तींची तोडफोड झालेली दिसते. गणपतीची स्त्री रूपातील भारतातील कदाचित एकुलती मूर्ती या मंदिरात आहे.

कार्ला लेणी:पुण्यापासून अंदाजे ४० किलोमीटरवर वर कार्ल्याची प्रसिध्द लेणी आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकातील आहेत. ही बौद्ध लेणी म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक अप्रतिम उदाहरण आहे. 
भीमाशंकर
भीमाशंकर हे भारतातील पुणे जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणावरील सर्वात प्रसिद्ध गोष्ट आहे म्हणजे येथील ज्योतिर्लिंग मंदीर. भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक येथे आहे. येथील ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते जी पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे.

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात विविध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात.
अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रसिध्द आह (सोलापूर).
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे 

बारा ज्योतिर्लिंग मंदिरे:सोरठी सोमनाथ • नागेश्वर •महांकालेश्वर • श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन • भीमाशंकर • ओंकारेश्वर • केदारनाथ • विश्वेश्वर •त्र्यंबकेश्वर • रामेश्वर • घृष्णेश्वर • वैजनाथ 

December 19, 2010

पुरस्कार -पुरस्कारविजेते

 ज्ञानपीठ पुरस्कार:-
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार ओळखला जातो.ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाक्देवीची प्रतीमा' आणि 'पाच लाख रुपयांचा धनादेश' ईत्यादिंचा समावेश असत
ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय शासनातर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिल्या जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ साली या पुरस्काराची अधिकृत घोषणा झाली आणि इ.स. १९६५ साली प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. आजपर्यंत सर्वाधिक वेळा पुरस्कार मिळाविण्याचा मान सात वेळा कन्नड आणि सहा वेळा हिंदी साहित्यिकांना मिळाला आहे. मराठी साहित्यिकांना तीन वेळा ह्या बहुमानाचा लाभ झाला असून विष्णू वामन शिरवाडकर, गोविंद विनायक करंदीकर आणि विष्णु सखाराम खांडेकर हे पुरस्कारविजेते मराठी साहित्यिक होय.
इ.स. २०००  इंदिरा गोस्वामी - आसामी
इ.स. २००१  राजेंद्र केशवलाल शाह - गुजराती
इ.स. २००२  दंडपाणी जयकांतन - तमिळ
इ.स. २००३  विंदा करंदीकर- अष्टदर्शने  मराठी
इ.स. २००६ रवींद्र केळेकर - कोकण

जनस्थान पुरस्कार:-
जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.कविश्रेष्ठ श्री वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानीत करण्यास सुरूवात केली.

आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जात.
पुरस्कार प्राप्त साहित्यीक:
२००९: ना.धों. महानोर
२००७: बाबूराव बागूल
२००५: नारायण सुर्वे
२००३: मंगेश पाडगावकर
२००१: श्री.ना. पेंडसे
१९९९: व्यंकटेश माडगूळकर
१९९७: गंगाधर गाडगीळ
१९९५: इंदिरा संत
१९९३: विंदा करंदीकर
१९९१: विजय तेंडुलकर

तन्वीर सन्मान:-
डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार दिला जातो. ९ डिसेंबर इ.स. २००८ मध्ये पं. सत्यदेव दुबे यांना दिला गेला.

या शिवाय पुरस्काराच्या 'तन्वीर रंगधर्मी' हा पुरस्कारही दिला जातो. ९ डिसेंबर इ.स. २००८मध्ये हा पुरस्कार अभिनेता गजानन परांजपे यांना दिला गेला

साहित्य अकादमी पुरस्कार:-
साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍यांना विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

इ.स.२००८ साल चा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना "उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरी साठी मिळाला.साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍यांना विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.


आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, इंग्लीश, गुजराथी, हिंदी, कन्नड, कश्मिरी, कोंकणी, मैथीली, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, व उर्दू
मराठीतील पुरस्कार विजेते:-
२००० – ना.धों. महानोर – 'पानझड'
२००१ – राजन गवस – 'टणकट'
२००२ – महेश एलकुंचवार – 'युगांत'
२००३ – त्र्यंबक विनायक सरदेशमुख – 'डांगोरा एका नगरीचा'
२००४ - सदानंद देशमुख - 'बारोमास'
२००५ - अरूण कोलटकर - भिजकी वही
२००६ - आशा बगे - भूमी
२००७ - जि. एम. पवार - विठ्ठल रामजी शिंदे: जिवन व कार्य
२००८ - श्याम मनोहर - 'उत्सुकतेने मी झोपलो'
२००९ - वसंत आबाजी डहाके - 'चित्रलिपी' काव्यसंग्रह.


कलिंग पुरस्कार:
कलिंग पुरस्कार हा ओरिसा सरकारच्या वतीने युनेस्को द्वारा दिला जातो.

सामान्य व्यक्तींना विज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी काम करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो

पद्मविभूषण पुरस्कार:-
द्मविभूषण हा भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.

जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगीत करण्यात आला होता.

सुरुवातीच्या काळात १.३७५ इंच व्यासाचे गोलाकार सुवर्णपदक पद्मविभूषण पुरस्कारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावर मधोमध उठावाचे नक्षीकाम केलेले कमळ, पद्मविभूषण अशी अक्षरे आणि खालच्या बाजूला कमळाच्या फुलांचे चक्र होते. दुसर्‍या बाजूस सरकारी राजमुद्रा, देश सेवा अशी कोरलेली अक्षरे आणि कमळाच्या फुलांचे चक्र होते. पण अशा पदकाची फक्त नोंद सापडते ती कुणाला प्रदान करण्यात आल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.

लगेचच दुसर्‍या वर्षी, म्हणजे १९५५ साली या पदकाचं स्वरुप बदलण्यात आलं. सोन्याऐवजी कांस्य धातूच्या १.१८७५ इंच व्यासाचे साधारण गोलाकार पदक तयार करण्यात आले. पदकाच्या एका बाजूला उठावदार कमळ कोरण्यात आले. त्याच्या समोरच्या चार पाकळ्या पांढर्‍या सोन्याने (सोने आणि निकेल किंवा सोने आणि पॅलाडियम धातूंपासून बनविलेला मिश्र धातू) मढविल्या गेल्या. वरच्या आणि खालच्या बाजूस चांदीचा मुलामा असलेली अनुक्रमे पद्म आणि विभूषण अशी अक्षरे कोरली केली. १९५५ पासून १९५७ पर्यंत ही अशी पदके वितरित करण्यात आली. त्यानंतर १९५८ सालापासून आजपर्यंत याच्या स्वरुपामध्ये ब्रॉन्झच्या धातूतील थोडा केलेला बदल वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पदकाच्या वरच्या बाजूला फिक्या गुलाबी रंगाची रिबन लावलेली असते.

सन २०१० पर्यंत एकूण २६४ थोर व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे दिल्लीच्या खालोखाल महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या किंवा महाराष्ट्र भूमी ही कार्यक्षेत्र असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्रातील पद्मविभूषणप्राप्त महान विभूतींची संख्या ४९ आहे, तर ५० दिल्लीवासियांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे
पुरस्कार विजेते:- 

२००९ चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव    नागरी सेवा      महाराष्ट्र भारत
२००९ सुंदरलाल बहुगुणा     पर्यावरण संरक्षण     उत्तराखंड भारत
२००९ डी.पी. चट्टोपाध्याय      साहित्य व शिक्षण    पश्चिम बंगाल भारत
२००९ जसबीरसिंग बजाज      वैद्यकशास्त्र    पंजाब भारत
२००९ पुरुषोत्तम लाल     वैद्यकशास्त्र     उत्तर प्रदेश भारत
२००९ गोविंद नारायण    सार्वजनिक कार्य     उत्तर प्रदेश भारत
२००९ अनिल काकोडकर    विज्ञान व तंत्रज्ञान    महाराष्ट्र भारत
२००९ जी.माधवन नायर    विज्ञान व तंत्रज्ञान    कर्नाटक भारत
२००९ सिस्टर निर्मला   सामाजिक कार्य    पश्चिम बंगाल भारत
२००९ ए.एस. गांगुली  व्यापार व उद्योग   महाराष्ट्र भारत

प्रथम पुरस्कारविजेते    सत्येन्द्र नाथ बसु  
(source:http://mr.wikipedia.org) 

दिनविशेष : preparation for state services exam 2011

जानेवारी=दिनविशेष
  • जानेवारी १:-
१८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
  • जानेवारी २:-
१७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.
१९५४ - भारतरत्न या सर्वोच्च किताबाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.
  • जानेवारी 4
१८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले
१९१४ - मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.
  • जानेवारी ५
१६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले
  • जानेवारी ६:-
जन्म:१९२८ - विजय तेंडुलकर, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, चित्रपटकथा लेखक.

  • जानेवारी ८:
२००६ - मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
  • जानेवारी १५:-
मृत्यू:१९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्त 
  • जानेवारी १९:
१९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी

  • जानेवारी २०:
१९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (चित्रीत) पिस्तुलाने खून केला.
जन्म:१८७१ - सर रतनजी जमशेदजी टाटा, भारतीय उद्योगपती.
  • जानेवारी २३:
जन्म:
१८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनान
  • जानेवारी २६ : भारतीय प्रजासत्ताक दिन 
  • जानेवारी २८:
२००३ - मंगेश पाडगावकरांना जनस्थान पुरस्कार जाहीर.

  • जानेवारी २९:
१७८० - हिकीज बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.

जानेवारी ३०: १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (चित्रीत) पिस्तुलाने खून केला.

 

December 18, 2010

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११(MPSC State Services Preliminary Examination 2011)--भूगोल1

गोदावरी नदी:
गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमुंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते.
समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.
उगम त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
लांबी    १,४६५ कि.मी.
उपनद्या    इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा
धरण    गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे. विदर्भातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आह

December 17, 2010

All about WikiLeaks

Slogan    We open governments.

What is WikiLeaks ?
WikiLeaks is an international new media non-profit organisation that publishes submissions of otherwise unavailable documents from anonymous news sources and news leaks. Its website, launched in 2006, is run by The Sunshine Press.

Who is founder of WikiLeaks  ?
Julian Assange 

Let;s know him...
Assange was reportedly born in 1971 in the city of Townsville, northeastern Australia. He was mostly homeschooled as a child, thanks in large part to his already peripatetic existence: by the time he was 14, he and his mother had reportedly moved 37 times.

•After his mother's relationship with a musician turned violent, Assange lived on the run between the ages of 11 and 16.

•When Assange turned 16, he began hacking computers, reportedly assuming the name Mendax — from the Latin splendide mendax, or "nobly untruthful."

•In 1991, at the age of 20, Assange and some fellow hackers broke into the master terminal of Nortel, the Canadian telecom company. He was caught and pleaded guilty to 25 charges; six other charges were dropped. Citing Assange's "intelligent inquisitiveness," the judge sentenced him only to pay the Australian state a small sum in damages.

•Assange studied math and physics at the University of Melbourne, though he dropped out when he became convinced that work by others in the department was being applied by defense contractors and militaries.

•In 2006, Assange decided to found WikiLeaks in the belief that the free exchange of information would put an end to illegitimate governance. The website publishes material from sources, and houses its main server in Sweden, which has strong laws protecting whistle-blowers. Assange and others at WikiLeaks also occasionally hack into secure systems to find documents to expose. In December 2006, the website published its first document: a decision by the Somali Islamic Courts Union that called for the execution of government officials. WikiLeaks published a disclaimer that the document may not be authentic but "a clever smear by U.S. intelligence."

•The website went on to get several prominent scoops, including the release in April 2010 of a secret video taken in 2007 of a U.S. helicopter attack in Iraq that killed a dozen civilians, including two unarmed Reuters journalists. Assange helped post the video from a safe house in Iceland that he and the other WikiLeaks administrators called "the bunker."
....
Financing
WikiLeaks is dependent on public donations since it is a non-profit organisation. Its main financing methods include conventional bank transfers and online payment systems. Wau Holland Foundation, one of the WikiLeaks' main funding channels, stated that they have received more than €900,000 (US$1.2 million) in public donations between October 2009 and December 2010, out of which €370,000 has been passed on to WikiLeaks

WikiLeaks claimed in April 2010 that Facebook deleted their fan page, which had 30,000 fans.[124][125][126] However, as of 7 December 2010 the group's Facebook fan page was available and had grown by 100,000 fans daily since 1 December,[127] to more than 1,300,000 fans. It is also the largest growth of the week.

Awards received
In 2008, Index on Censorship presented WikiLeaks with their inaugural Economist New Media Award.


In 2009, Amnesty International awarded WikiLeaks their Media Award for exposing "extra judicial killings and disappearances" in Kenya

Most of the governments and organisations whose files have been leaked by WikiLeaks have been critical of the organisation.

IN 2010:
In March 2010, WikiLeaks released a secret 32-page U.S. Department of Defense Counterintelligence Analysis Report written in March 2008 discussing the leaking of material by WikiLeaks and how it could be deterred.[252][253] 

In April, a classified video of the 12 July 2007 Baghdad airstrike was released, showing two Reuters employees being fired at, after the pilots mistakenly thought the men were carrying weapons, which were in fact cameras.[254] In the week following the release, "Wikileaks" was the search term with the most significant growth worldwide in the last seven days as measured by Google Insights.[255] In June 2010, A 22-year-old US Army intelligence analyst, PFC (formerly SPC) Bradley Manning, was arrested after alleged chat logs were turned in to the authorities by former hacker Adrian Lamo, in whom he had confided. Manning reportedly told Lamo he had leaked the "Collateral Murder" video, in addition to a video of the Granai airstrike and around 260,000 diplomatic cables, to WikiLeaks.[256] 

In July, WikiLeaks released 92,000 documents related to the war in Afghanistan between 2004 and the end of 2009 to The Guardian, The New York Times and Der Spiegel. The documents detail individual incidents including friendly fire and civilian casualties.[257] At the end of July, a 1.4 GB "insurance file" was added to the Afghan War Diary page, whose decryption details would be released if WikiLeaks or Assange were harmed.[101] About 15,000 of the 92,000 documents have not yet been released on WikiLeaks, as the group is currently reviewing the documents to remove some of the sources of the information. WikiLeaks asked the Pentagon and human-rights groups to help remove names from the documents to reduce the potential harm caused by their release, but did not recieve assistance.[258] Following the Love Parade stampede in Duisburg, Germany on 24 July 2010, a local published internal documents of the city administration regarding the planning of Love Parade. The city government reacted by acquiring a court order on 16 August forcing the blog to remove the documents from its blog.[259] On 20 August WikiLeaks released a publication titled Loveparade 2010 Duisburg planning documents, 2007–2010, which comprised 43 internal documents regarding the Love Parade 2010.[260][261] Following on from the leak of information from the Afghan War, in October 2010, around 400,000 documents relating to the Iraq War where released in October. 
---------From Wikipedia